वाईट नेता मिळणं ही महाराष्ट्राची चूक नाही; अमृता फडणवीसांची मुख्यमंत्र्यांवर टीका

0
384

मुंबई,दि.२९(पीसीबी) – माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना लक्ष्य करताना, ‘वाईट नेता मिळणं ही महाराष्ट्राची चूक नाही, पण त्या नेत्यासोबत राहणं ही मात्र चूक आहे’ अशी घणाघाती टीका केली आहे.

वाईट नेता मिळणं ही महाराष्ट्राची चूक नाही, पण वाईट नेत्यासोबत राहणं ही महाराष्ट्राची चूक आहे, असं म्हणत अमृता यांनी उद्धव ठाकरे यांना टार्गेट केलं आहे. त्यामुळे फडणवीस-ठाकरे वाद टोकाला जाण्याची चिन्हं निर्माण झाली आहेत.

अमृता फडणवीस या अ‌ॅक्सिस बँकेच्या पश्चिम भारताच्या उपाध्यक्ष आणि कॉर्पोरेट हेड आहेत. या बँकेतील २ लाख पोलिसांची खाती स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये वळवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यामुळे शिवसेनेचा हा वार अमृता यांच्या जिव्हारी लागला आहे.

सरकारने विचारपूर्वक निर्णय घ्यायला हवेत. पण अशा प्रकारे खाते वळवण्याचा निर्णय घेऊन सरकार मला आणि देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप अमृता यांनी केला आहे.