वंचित ही भाजपची बी टीम असल्याचा आधी खुलाशा; नंतरच आघाडीची चर्चा

0
400

मुंबई, दि. १ (पीसीबी) – विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर यांनी आज आपली भूमिका स्पष्ट केली. प्रकाश आंबेडकर म्हणाले, काँग्रेसने लोकसभा निवडणुकीच्या वेळी वंचित ही भाजपची बी टीम असल्याचा आरोप केला होता. याबाबत काँग्रेसने खुलासा करावा. त्यानंतर आम्ही काँग्रेससोबत चर्चा करू, असा इशारा आंबेडकरांनी दिला आहे.

लोकसभा निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीने राष्ट्रवादी काँग्रेला नकार देत आपले उमेदवार रिंगणात उभे केले होते. त्यामुळ भाजपला फायदा तर काँग्रेसला यांचा चांगलाच झटका बसला होता. आता विधानसभा निवडणुकीमध्ये देखील तीच परिस्थिती समोर येत आहे. त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडी या महिन्यात आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर करणार आहे. असे प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले आहे.