लोकांना पंतप्रधान नरेंद्र मोदींना पर्याय हवा आहे – शरद पवार

0
507

मुंबई,दि.८(पीसीबी) – राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी देशातील जनतेच्या मूडबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. केंद्र सरकारनं अनेक चुकीचे निर्णय घेतले. त्यामुळे लोकांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पर्याय हवा आहे, असं मत पवार यांनी व्यक्त केलं.

लोकहितासाठी मारक निर्णय घेतल्यानंतरही लोक वेगळी भूमिका घेऊन त्यांची तुलना का करत नाही? कारण लोकांना पर्याय अपेक्षित आहे. आम्ही पर्याय देऊ शकतो, असा आत्मविश्वास जनतेमध्ये निर्माण करण्यात कुणाला यश मिळाल आहे का?, असं प्रश्न पवार यांनी उपस्थित केला आहे.

मी हे मान्य करतो की, आम्ही सर्व विरोधक यासाठी जबाबदार आहोत. जोपर्यंत कुणीतरी जनतेच्या मनात हा आत्मविश्वास निर्माण करत नाही की मोदींना पर्यायी व्यक्ती म्हणून मी उत्तर देवू शकतो. आम्ही महाराष्ट्रात सत्ताबदल केला आहे. लोकांचा पाठिंबा मी अनुभवला आहे. लोक देशाविषयी विचार करतात, असंही पवार यांनी यावेळी म्हटलं आहे.