लोकसभेच्या निकालादिवशी मोदी ‘या’ कामात व्यग्र होते

0
556

नवी दिल्ली, दि. २५ (पीसीबी) – देशात गुरूवारी (दि. २३) लोकसभा निवडणुकीच्या निकालादिवशी साऱ्यांच्या नजरा टीव्हीवरच्या निकालांकडे लागले होत्या.  निकालांच्या आकड्यात होणारी चढउतार पाहून अनेक जण कोण सत्तेवर येणार याचे अंदाज बांधत होते. पण या  निकालाच्या  धाकधुकीच्या वातावरणात   पंतप्रधान मोदी  ई-मेल पाहण्यामध्ये व्यस्त होते.

त्या दिवशी मोदी यांनी नेहमीपेक्षा जास्त वेळ ई-मेलच्या कामामध्ये घालवला. त्यांनी बहुतेक ई-मेल फॉरवर्ड केले तर काही ई-मेलला त्यांनी स्वत: उत्तर दिले. सकाळी १०.३० वाजता  मोदींनी ई-मेलचे काम संपवले व निकालाच्या आकडयांकडे लक्ष देण्यास सुरुवात केली. निकालाचा कल भाजपाला अनुकूल असाच होता. तासाभराने भाजपाची आघाडी अधिक मजबूत झाली व भाजपा सरकार पुन्हा येणार असल्याचे स्पष्ट झाले.

टीव्हीवर निकाल पाहण्याबरोबरच पंतप्रधान मोदी अन्य सूत्रांकडूनही निकालाची माहिती घेत होते. मतमोजणी केंद्रावरुन येणाऱ्या माहितीची पंतप्रधान मोदी वेळोवेळी चौकशी करत होते. मतदार भाजपा सरकारवर विश्वास दाखवतील याची मोदी यांना खात्री होते. निकालाच्या दुसऱ्यादिवशी शुक्रवारी मोदींनी मंत्रिमंडळाची बैठक घेतली.