मुंबई, दि. २९ (पीसीबी) – आगामी लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यात आघाडी होण्याची शक्यता आहे. या दोन्ही पक्षांत आघाडी करण्यासंदर्भात चर्चा सुरू असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीने तीन जागा सोडाव्यात, अशी मनसेची मागणी असल्याचे समजते. ठाणे, नाशिक आणि मुंबईतील एका जागेचा त्यामध्ये समावेश आहे. परंतु, राष्ट्रवादी एक किंवा दोन जागा देण्यास तयार असल्याचे बोलले जात आहे. राष्ट्रवादीने आघाडीच्या जागा वाटपात मिळालेल्या मतदारसंघाचे उमेदवार जवळपास निश्चित केले आहेत. परंतु, ठाणे लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार अद्याप निश्चित केलेला नाही. मनसेसोबत आघाडी झाल्यास ही जागा राष्ट्रवादी इंजिनासाठी सोडेल, असे बोलले जात आहे.