लोकसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर पंतप्रधान मोदी काय म्हणतात…

0
539

नवी दिल्ली, दि. ११ (पीसीबी) – केंद्रीय निवडणूक आयोगाने १७ व्या लोकसभा निवडणुकीची घोषणा केली आहे. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेकडे पाठिंबा मागितला आहे. पंतप्रधान मोदी यांनी ट्वीट करत पुन्हा एकदा निवडून देण्याचे जनतेला आवाहन केले आहे.

‘सबका साथ, सबका विकास’ या मुल्यांतर्गत काम करणाऱ्या एनडीएला तुमच्या आशीर्वादाची गरज आहे. गेल्या ७० वर्षांपासून देशवासियांचा ज्या गरचा पूर्ण केल्या नव्हत्या, त्या पूर्ण करण्यासाठी आम्ही गेल्या पाच वर्षांपासून कामे करत आहोत. आता वेळ आली आहे, या देशाला शक्तीशाली, समृद्ध आणि सुरक्षित करण्याची गरज आहे, असे ट्विटमध्ये म्हटले आहे.  नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करताना ‘फिर एक बार मोदी सरकार’ (#PhirEkBaarModiSarkar)असा हॅशटॅग वापरला आहे.

मोदींनी  आणखी एक ट्वीट करुन एनडीए सरकारच्या  काळातील केलेल्या  कामांची  माहिती दिली आहे. ५० कोटी भारतीयांना चांगले आरोग्य दिले. असंघटित क्षेत्रातील ४२ कोटी लोकांना ओल्ड एज पेन्शनची सुविधा दिली. किसान सहाय्यता निधीअंदर्गत १२ कोटी शेतकऱ्यांना ६ हजार रुपये दिले.