लोकशाहीची गळचेपी म्हणणाऱ्यांचे थोबाड फोडले पाहिजे – विक्रम गोखले

0
603

मुंबई, दि. २९ (पीसीबी) – लोकशाहीची गळचेपी होत आहे, असे म्हणणाऱ्यांचे थोबाड फोडले पाहिजे,  अशी संतप्त प्रतिक्रिया ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी दिली. गोखले यांनी आज (सोमवार) मुंबईतील विले पार्ले या ठिकाणी मतदान केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना प्रतिक्रिया दिली.  

गोखले म्हणाले की, मतदान हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. मतदानाच्या दिवशी सुट्टी एंजॉय करणारे आणि मतदानाकडे पाठ फिरवणारे लोक या देशाचे क्रमांक एकचे शत्रू आहेत. जास्तीत जास्त प्रमाणात मतदान होण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले.

देशात लोकशाही धोक्यात आहे, लोकशाहीची गळचेपी होते आहे,  असे कोण म्हणत आहे,  त्यांना समोर आणा! मी आत्ता माझं मत मांडतो आहे, इथे प्रत्येकजण मत मांडू शकतो, यांना मतदान करा किंवा करू नका हे सांगू शकतो, अशावेळी गळचेपी होते आहे अशी ओरड करणारी माणसे आहेत कोण?  त्यांना माझ्यासमोर आणा, असे आव्हानच गोखले यांनी दिले.