लेखिकेसोबत पतीच्या अफेअरमुळे दिया मिर्झाचा संसार मोडला?

0
347

मुंबई, दि. २ (पीसीबी) – बॉलिवूड अभिनेत्री दिया मिर्झाने पती साहिल संघापासून विभक्त झाल्याचे गुरुवारी सोशल मीडियावर जाहीर केले. त्यानंतर बॉलिवूडमधील आणखी एका जोडीने घटस्फोट दिल्याचे जाहीर करत चाहत्यांना धक्का दिला. ही जोडी म्हणजे लेखिका कनिका ढिल्लोन आणि दिग्दर्शक प्रकाश कोवेलामुडी. या दोन्ही घटनांनंतर कनिका आणि दिया मिर्झाचा पती साहिल यांचे एकमेकांशी अफेअर असल्याने घटस्फोट झाल्याच्या चर्चा रंगू लागल्या. या सर्व चर्चांवर आता खुद्द कनिकाने ट्विटरवर पोस्ट लिहित स्पष्ट केले आहे.

कनिकाने ट्विटरवर लिहिले, ‘हास्यास्पद, बेजबाबदारपणा! लेखन हे माझे काम आहे. दोन बातम्या एकाच वेळी समोर आल्याने त्यांचा एकमेकांशी संबंध असेल असा अर्थ होत नाही. मी माझ्या आतापर्यंतच्या आयुष्यात दिया किंवा साहिलला भेटले नाही. कृपया या अफवा पसरवणे बंद करा.’

पाच वर्षांच्या संसारानंतर दिया आणि साहिल विभक्त झाले. एकमेकांच्या संमतीने हा निर्णय घेतल्याचे दियाने सोशल मीडियावरील पोस्टमध्ये लिहिले. घटस्फोटानंतरही आमच्यात मैत्री कायम राहील असेही तिने त्यात म्हटले होते.