यवतमाळ, दि. ८ (पीसीबी) – काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी लालकृष्ण आडवाणी यांची काळजी करू नये. स्वतःच्या पक्षातील नालायक माणसांकडे बघावे, त्यांच्याविरोधात काय कारवाई करणार, ते सांगावे, अशा निशाणा शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी साधला.
पंतप्रधान मोदी हे हिंदू धर्म आणि परंपरा यांचे महत्त्व सांगतात. मात्र आडवाणींना मोदींनी जोडे मारून हाकलले, अशी टीका राहुल गांधी यांनी केली. त्यावर उद्धव ठाकरे यांनी यवतमाळमध्ये झालेल्या सभेत चोख प्रत्युत्तर दिले.
शेतकऱ्यांवर गोळ्या चालवणाऱ्या तुमच्या काँग्रेस नेत्यांना तुम्ही जाब का विचारत नाही, असेही उद्धव ठाकरेंनी राहुल गांधींना सुनावले. काँग्रेसने दिलेला जाहीरनामाही देशासाठी घातक आहे. प्रियंका गांधी आणि राहुल गांधी जनतेला खोटी आश्वासन देत आहेत, अशीही टीका उद्धव ठाकरे यांनी यावेळी केली.