अकलूज, दि. १ (पीसीबी) – राष्ट्रवादी काँग्रेसकडे असलेली लोकसभेची अहमदनगरची जागा काँग्रेसला सोडण्यात आल्याची घोषणा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी (दि. १) केली आहे. अकलूज येथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. त्यामुळे दीर्घकाळ सुरू असलेला या जागेचा तिढा आता सुटला आहे. काँग्रेसकडून या जागेसाठी विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे यांचे चिरंजीव डॉ. सुजय विखे प्रबळ दावेदार आहेत