राष्ट्रवादीचीही अडीच वर्ष मुख्यमंत्रिपदाची मागणी – सुनील तटकरे

0
799

नवी दिल्ली,दि.२१(पीसीबी) – पाच वर्ष शिवसेनेचाच मुख्यमंत्री असणार, असं खासदार संजय राऊत सांगत असतानाच आता राष्ट्रवादीकडूनही अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रिपदाचा आग्रह होताना दिसत आहे. अडीच वर्ष मुख्यमंत्रिपदाची चर्चा अद्याप झालेली नाही, परंतु अडीच वर्ष मुख्यमंत्रिपद राष्ट्रवादीलाही मिळावं, अशी मागणी असल्याचं राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांनी सांगितलं.

राष्ट्रवादीला शिवसेनापेक्षा दोनच जागा कमी मिळाल्या आहेत. त्यामुळे मुख्यमंत्रिपद राष्ट्रवादीलाही मिळावं, अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे. याबाबत आजच्या बैठकीत चर्चा केली जाणार आहे, सुनिल तटकरे यांनी सांगितलं.

विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला ५६, राष्ट्रवादीला ५४ तर काँग्रेसला ४४ जागा मिळाल्या आहेत. सत्तास्थापनेचा दावा करण्याची तारीख अद्याप निश्चित नसल्याचं तटकरेंनी सांगितलं.