मुंबई, दि. १० (पीसीबी) – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना लोक ऐकतही नाहीत आणि त्यांना मत ही देत नाहीत, सुपारी घेऊन ते भाषण करतात. पंतप्रधान मोदी हे सुर्यासारखे आहेत. त्यांच्याकडे पाहून थुंकल्यास ते आपल्यावरच पडते, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
मुंबई येथे भाजपच्या महिला मेळाव्यात मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. राज ठाकरे यांनी शनिवारी मनसेच्या १३ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित मेळाव्यात मोदी यांच्यावर टीका केली होती. या टीकेचा मुख्यमंत्र्यांनी खरपूस समाचार घेतला.
मुख्यमंत्री म्हणाले की, पंतप्रधान मोदी यांच्या हातात भारत सुरक्षित असून भारतावरील हल्ल्यानंतर त्यांनी सडेतोड उत्तर दिले. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपा सज्ज आहे. गेल्या ५० वर्षांत जे घडले नाही, ते मागील ५ वर्षांत घडले. यावेळी महाराष्ट्रात भाजप-शिवसेना युती ४५ घेईल, असा दावा त्यांनी यावेळी केला.