राज ठाकरेंच्या सभांचा काँग्रेस-राष्ट्रवादीला फायदा होईल – अजित पवार

0
528

बारामती, दि. २३ (पीसीबी) – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभांमुळे  काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसला फायदा होईल. त्यांच्या सभांचा  चांगला प्रभाव पडेल, असे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी म्हटले आहे.  जनतेचा मोदींवर विश्वास राहिलेला नाही, त्यामुळे मोदींच्या सभेला गर्दी जमवावी लागते, असेही  ते म्हणाले.

अजित पवार यांनी आज ( मंगळवार) बारामतीत मतदान केले. मतदानानंतर त्यांनी  पत्रकाराशी संवाद साधला.

यावेळी पवार म्हणाले की, टीका करण्यास आम्ही सुरुवात केली नाही. भाजपने सुरुवात केली होती. शरद पवार देशभरात फिरतात. पण शरद पवार कधी असे टोकाचे आरोप करत नाही. पण यंदा शरद पवारांना असे आरोप करावे लागले. त्यांच्या आरोपांमध्ये तथ्य होते. ५२ वर्षे आम्ही चांगले काम केली. आता जी कामे अपूर्ण आहेत, ती देखील आम्हीच पूर्ण करणार, असे त्यांनी सांगितले.

राज ठाकरे यांच्या सभांमुळे चांगला प्रभाव पडणार आहे. पूर्वी मोदींच्या सभेला गर्दी व्हायची, पण लोकांचा आता मोदींवर विश्वास नाही. त्यामुळे वर्धा येथील सभेला गर्दीच झाली नव्हती. आता काही लोकांना गर्दी जमवावी लागते. गाड्यांची सोय करावी लागते.  पण आम्हाला तसे करावे लागत नाही, असे  पवार म्हणाले.