राज्यातील सिंचनाचे सर्व प्रकल्प पूर्ण करणार – नितीन गडकरी  

0
333

नागपूर, दि. १ (पीसीबी) – राज्यातील सर्व सिंचनाचे   प्रकल्प पूर्ण करणार, अशी घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली. केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर नितीन गडकरी नागपुरात आले.  येथे त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी त्यांनी पहिल्यांदाच पत्रकार परिषद घेतली.  देशाचा जीडीपी वाढवणे आणि रोजगार निर्मिती करणे, हा महत्त्वाचा मुद्दा आमच्या दृष्टीने आहे, असे ते म्हणाले.

लघू उद्योग आणि रोजगार निर्मिती करणे हे माझ्यापुढचे लक्ष्य आहे. अजून कोणतेही टार्गेट सेट केलेले नाही. नवीन योजना आणायच्या आहेत. ग्रामीण भागात रोजगार निर्मितीला प्राधान्य दिले जाईल.  विविध भागात रस्त्यांची कामे सुरू करण्यात आली आहेत. रस्त्यांच्या लगत १२५ कोटी वृक्ष लागवड करणार असल्याचे लक्ष्य आहे, असेही गडकरींनी  सांगितले.  खादी ग्रामोद्योग, कृषी क्षेत्रात रोजगार निर्मिती करणार आहे, असेही गडकरी यांनी म्हटले आहे.

माझं काम जास्तीत जास्त करणार, मी सर्वाधिक कार्यक्षम मंत्री आहे की नाही हे लोकांनी ठरवायचे आहे. मी स्वतः जेवढं काम करायचं तेवढं करत रहाणार आहे, असेही त्यांनी  म्हटले आहे. मार्च २०२० पर्यंत गंगा शुद्धीकरणाचे काम करणार आहे. रोजगारनिर्मितासाठी कसोशीने प्रयत्न करणार आहे तसेच  इतर मंत्र्यांनाही मी माझ्या परिने सहकार्य करणार आहे, असेही गडकरी यांनी यावेळी स्पष्ट केले.