राजकारणातील तथाकथित चाणक्याला शरद पवारांनी दिली मात – नवाब मलिक

0
509

मुंबई,दि.२२(पीसीबी) – काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांचे एकत्रित सरकार महाराष्ट्रात येणार असल्याचं जवळजवळ निश्चित झालं आहे. यापार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी गृहमंत्री अमित शहा यांना टोला लगावला आहे.

भारतीय राजकारणातील तथाकथित चाणक्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मात दिली आहे. महाराष्ट्राला दिल्लीचे तख्त झुकवू शकले नाही…जय महाराष्ट्र, असं मलिक म्हणाले आहेत. त्यांनी यासंदर्भात ट्विट केलं आहे.

विधानसभा निवडणुकीत भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत. मात्र, असे असून सुद्धा भाजपला राज्यात सरकार स्थापन करता आले नाही. भाजपचे चाणक्य मानले जाणारे अमित शहा हेही महाराष्ट्रात काही करु शकले नाहीत. यावरुन मलिकांनी भाजपला डिवचलं आहे.