मुंबई, दि. ३ (पीसीबी) – येत्या १५ दिवसात मोठा राजकीय निर्णय घेणार आहे, असे काँग्रेसमध्ये नाराज असलेले विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज (बुधवार) एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले.
विखे-पाटील म्हणाले की, माझी भूमिका स्पष्ट आहे. मी गोंधललेलो नाही, उलट माझ्यामुळे अनेकजण गोंधळले आहेत. सुजयच्या तिकिटावरून निर्माण झालेला गोंधळ थांबविण्याचा मी प्रयत्न केला. मात्र, गोंधळ थांबवू शकलो नाही, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
मी एकच तत्व डोळ्यासमोर ठेवले आहे. वेळ हा सर्व गोष्टींवर उपाय आहे. माझी भूमिका नेहमी स्पष्ट राहिली आहे. आपण पक्षाने दलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडली आहे. सुजयच्या बाबतीत निर्णय करण्याचा प्रश्न आला त्यावेळी पक्षांतर्गत काही गोष्टी घडल्या, ज्यावर मी बोलू इच्छित नाही, असे ते यावेळी म्हणाले.