युतीची चर्चा गेली खड्ड्यात; उध्दव ठाकरेंचा पुनरूच्चार

0
637

बीड, दि. ९ (पीसीबी) – युतीची चर्चा गेली खड्ड्यात! पहिले माझ्या शेतकऱ्याचे काय करता ते बोला,  अशी विचारणा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज (बुधवार) सरकारला केली. आपला कोण आणि थापाड्या कोण हे आता ओळखायला पाहिजे. कोरडी भाषणे आणि कोरड्या घोषणांनी हंडे भरत नाही,  असा टोला लगावत सरकारी यंत्रणेचा सुस्त अजगराला ढोसकण्यासाठी मी फिरतोय , असे  उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

उद्धव ठाकरे मराठवाडा दौऱ्यावर आले आहेत.