…यासाठीच मोदींच्या नेतृत्वाखाली एनडीएला पाठिंबा दिला होता – आदित्य ठाकरे

0
393

मुंबई, दि. ५ (पीसीबी) – केंद्र सरकारने कलम ३७०  हटविल्यामुळे जम्मू काश्मीर खऱ्या अर्थाने भारताचा अविभाज्य भाग होणार आहे. त्यामुळे काश्मीर हे सुरक्षित, प्रगतशील राज्य म्हणून उभे राहू शकेल, असा विश्वास युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला आहे.

कलम ३७० हटविल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी  या ऐतिहासिक निर्णयाचे ट्विटरद्वारे कौतुक केले. एनडीएसाठी अभिमानास्पद असा हा क्षण आहे. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संसद आणि जनतेचे अभिनंदन करतो. यासाठीच आम्ही २०१९ च्या लोकसभा निवडणुकीसाठी मोदींच्या नेतृत्वात एनडीएला पाठिंबा दिला होता, असेही त्यांनी ट्विटरमध्ये म्हटले आहे.

तसेच जम्मू काश्मीर आणि लडाख नव्या उभारणीसाठी मी प्रार्थना करतो. त्या राज्यातील नागरिकांना फायदा होणार आहे. राज्यात शांतता, प्रगती आणि भरभराट होईल. वर्षोनुवर्षे रखडलेला प्रश्न सुटला आहे, अशी प्रतिक्रिया आदित्य यांनी   दिली आहे.