…म्हणून शिवसेनेविषयी भावना उचंबळून आल्या; संजय राऊतांचा मुख्यमंत्र्यांना टोला

0
728

मुंबई, दि. २८ ( पीसीबी) – राज्यातील भाजप सरकारचा चार वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शिवसेनेविषयीच्या भावना उचंबळून आल्या आहेत,  असा टोला शिवसेना  नेते संजय राऊत यांनी लगावला आहे.

सरकारला चार वर्ष  पूर्णझाल्याच्या पार्श्वभूमीवर  शिवसेना आणि भाजपची आगामी  निवडणुकीत युती होईलच,  असा ठाम विश्वास  फडणवीस यांनी व्यक्त  केला  आहे. यावर   संजय राऊत यांनी भाष्य केले आहे.

आम्ही चार वर्षांचा कारभार  बघत आहे.  शिवसेनेवरील प्रेम उतू का जात आहे?  भावना उचंबळून का येताहेत ? ते आम्हाला कळत आहे. आमच्या भावना उचंबळून येताहेत का ते नंतर ठरवू. आम्ही आमच्या भावना स्पष्ट केल्या आहेत. त्या पुन्हा एकदा योग्यवेळी  स्पष्ट करू , असे ते म्हणाले.