मोदी आता पुढील ५ वर्ष आणखी देशाची वाट लावणार – प्रकाश आंबेडकर

0
397

अहमदनगर, दि. १ (पीसीबी) – पंतप्रधान मोदी यांनी  गेली ५ वर्ष वाट लावली, आता पुढील ५ वर्ष आणखी देशाची वाट लावणार, अशी टीका  वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी  केली आहे. राष्ट्रपती भवनात गुरुवारी मोदी यांनी दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली.  यावर  प्रकाश आंबेडकर यांनी  पत्रकारांशी बोलताना प्रतिक्रिया दिली. 

प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चेवरही भाष्य केले आहे. मुस्लिम मतांसाठी विलिनीकरणाची चर्चा सुरु आहे, अशीही टीका त्यांनी यावेळी केली आहे.

दरम्यान, प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीदेखील आगामी विधानसभा निवडणूक स्वबळावर लढणार आहे. वंचित बहुजन आघाडीला राज्यातील ८ लोकसभा मतदारसंघात लक्षणीय मते मिळाल्याने, आघाडीच्या उमेदवारांना त्याचा फटका बसला आहे. त्यामुळे वंचित आघाडीला विधानसभा निवडणुकीसाठी सोबत घेण्याचा प्रयत्न आघाडी करीत आहे.