मोदींनी राजीव गांधींवर केलेला आरोप निराधार; निवृत्त नौदल अधिकाऱ्याचा दावा

0
505

नवी दिल्ली, दि. ९ (पीसीबी) – दिवंगत माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी आयएनएस विराट या युद्धनौकेचा वापर कुटुंबासोबत  सुट्टी घालविण्यासाठी केला, असा आरोप पंतप्रधान मोदी यांनी  केला होता. हा आरोप नौदलाचे निवृत्त अधिकारी अॅडमिरल एल. रामदास यांनी फेटाळून लावला आहे. विराट युद्धनौकेचा वापर राजीव यांनी कौटुंबिक सहलीसाठी केल्याचा दावा खोटा आहे,  असे त्यांनी प्रसिध्द केलेल्या पत्रकात म्हटले आहे. 

राजीव गांधी यांच्या त्या अधिकृत शासकीय दौऱ्यात त्यांच्या पत्नीशिवाय कुटुंबातील अन्य सदस्य नव्हते. त्यावेळी खबरदारी म्हणून राजीव गांधी आणि त्यांच्या पत्नीसाठी एका हेलिकॉप्टरची सोय करण्यात आली होती, असे रामदास यांनी पत्रकात म्हटले आहे.

लक्षद्वीप बेटावर मोदी यांनी खासगी दौऱ्यासाठी १० दिवसांसाठी विराट युद्धनौकेचा वापर केला होता.  या प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीच्या आधारे पंतप्रधान मोदी यांनी राजीव गांधी यांच्यावर आरोप केले असतील, अशी शक्यता  एल. रामदास यांनी व्यक्त केली आहे.