मोदींना देशाचे विभाजन करायचे आहे – राहुल गांधी  

404

हैदराबाद, दि. २० (पीसीबी) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देशाचे विभाजन करण्याची इच्छा आहे. सध्या देशात फार बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे, अशी टीका काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज (शनिवार) येथे केली.

हैदराबादमध्ये एका रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. सध्या देशात अशी परिस्थिती आहे की तळागाळातील लोकांना, मागासवर्गीयांना धमकावले जात आहे. तर स्त्रियांना घराबाहेर पडण्याचीही भीती वाटते आहे, याला पंतप्रधान मोदी यांचे विभाजनाचे धोरण कारणीभूत असल्याची टीका राहुल गांधी यांनी यावेळी केली.

मोदी यांना देशातील गरीब-श्रीमंत, मागास आणि उच्च अशा वर्गांमध्ये दरी निर्माण करायची आहे. त्याचमुळे देशातील वातावरण त्यांनी अस्थिर केले आहे, असाही आरोप राहुल गांधी यांनी  यावेळी केला.