मुख्यमंत्र्यांचे केंद्रीय अर्थमंत्र्यांना पत्र ,जीएसटीचे १५ हजार ५५८कोटी रुपये द्या

0
369

मुंबई,दि.११(पीसीबी) – वस्तू व सेवा कर (,जीएसटी) मोबदला आणि कर परताव्याची एकूण १५ हजार ५५८ कोटी रुपयांची रक्कम राज्याला लवकरात लवकर मिळावी, अशी विनंती पत्राद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

त्यामुळे केंद्र सरकार मुख्यमंत्र्यांची मागणी मान्य करणार का, याची उत्सुकता आहे. दरम्यान, केंद्र सरकारकडून राज्य शासनाला येणारा कर परतावा कमी झाल्यामुळे राज्यातील विकास कामांवर परिणाम होत आहे. याचा विचार करण्यात आला पाहिजे, असे या पत्राच्या माध्यमातून सूचित करण्यात आले आहे. ही रक्कम लवकरात लवकर मिळावी जेणेकरून राज्यातील विकास कामांना वेग देता येईल, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.