“मुख्यमंत्रिपद अजितदादाच सांभाळतात, खरे मुख्यमंत्री तर दहा ते पाचच काम करतात”

0
599

मुंबई,दि.११(पीसीबी) – मुख्यमंत्रिपद अजितदादाच सांभाळतात, खरे मुख्यमंत्री तर दहा ते पाचच काम करतात, असं मनसे नेते संदिप देशपांडे म्हणाले आहेत. त्यांनी यासंदर्भात एक ट्विट केलं आहे.

महाराष्ट्रातील किंवा देशातील सध्याच्या विरोधी पक्षाची स्थिती पाहता ‘शॅडो’ कॅबिनेटचा प्रयोग म्हणजे ‘हा खेळ सावल्यांचा’ नाट्यप्रयोग ठरू नये, असा टोला शिवसेनेनं मनसेला लगावला आहे. यालाच संदिप देशपांडे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

मुख्यमंत्रिपद अजितदादाच खऱ्या अर्थाने सांभाळत असल्यामुळे खरे मुख्यमंत्री दहा ते पाचच काम करतात, असं म्हणत संदिप देशपांडे यांनी शिवसेनेवर टीकास्त्र सोडलं आहे.

दरम्यान, एकही महत्वाचं खातं नसलेले महाराष्ट्रातले पाहिले मुख्यमंत्री सध्या शॅडो म्हणूनच काम करतायत त्यामुळे शॅडो मुख्यमंत्रिपद देऊन वेळेचा अपव्यय कशासाठी असा विचार राजसाहेबांनी केला असावा, असं संदिप देशपांडे यांनी म्हटलं आहे.