“मुंबई सारख्या शहरात कोरोना आटोक्यात येऊ शकतो तर पुण्यात काय अडचण आहे ?”

0
373

पुणे,दि.१२(पीसीबी) – मुंबई सारख्या शहरात कोरोना आटोक्यात येऊ शकतो तर पुण्यात काय अडचण आहे, असं म्हणत राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी वरिष्ट अधिकाऱ्यांना सवाल केला आहे. कोरोना परिस्थीतीबाबत आढावा घेण्यासाठी शुक्रवारी 11 सप्टेंबर रोजी पुण्यातील विधानभवन सभागृहात वरिष्ट अधिकाऱ्यांसोबर अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते.

“मुंबई सारख्या शहरात कोरोना आटोक्यात येऊ शकतो तर पुण्यात काय अडचण आहे. राज्य सरकार तुमच्या पाठीशी असून अधिकाऱ्यांना फ्री हॅन्ड दिल्यानंतर देखील परिस्थीती का सुधारत नाही. येत्या काही दिवसात पुण्यातील कोरोना संसर्ग नियंत्रणात आला नाही तर, पुढील बैठकीत यातील काही अधिकारी पुण्यात दिसणार नाहीत”, अशा शब्दात अजित पवार यांनी अधिकाऱ्यांना ठणकावलं आहे.

दरम्यान या बैठकीत संबंधीत विभागांचे वरिष्ट अधिकारी आणि पदाधिकारीही उपस्थीत होते. कोरोना आटोक्यात न आल्यास वरिष्ट अधिकाऱ्यांचीही गय केली जाणार नाही हे अधिकाऱ्यांनी लक्षात घ्यावं. तसेच अधिकाऱ्यांकडून कामात कोणतीच दिरंगाई होता कामा नये. मला कामाचा हिशोब द्यावा लागेल, असंही पवार यांनी बैठकीत म्हटलं आहे.