मुंबई महापालिकेत मुस्लीम तुष्टीकरणाचे गलिच्छ राजकारण – विश्व हिंदू परिषदेच गंभीर आरोप

0
537

मुंबई, दि.१६ (पीसीबी): कोविद महामारीच्या काळात विश्व हिन्दू परिषदेने अन्न वाटप, रूग्ण वाहीका  आणि कोविदमुळे मरण पावलेल्या मृत देहांचे अंत्यसंस्कार  करण्यास मुंबई मनपाला सहकार्य करण्याची तयारी असल्याचे लेखी  कळविले होते. परंतु याबाबत  मुंबई मनापाने कोणताही सकारात्मक प्रतिसाद दिला नाही.दुसरीकडे पॉप्युलर फ्रंट ऑफ़ इंडिया आणि इतर मुस्लिम संघटनांना मात्र याबाबत अनुमती दिली आहे. हा दुजाभाव कशासाठी?, असा सवाल विश्व हिंदू परिषदेने प्रसिद्धी पत्रक द्वारे उपस्थित केला आहे.

पत्रकात म्हटले आहे की, विश्व हिंदू परिषदेकडे फार मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उपलब्ध आहेत व  गेल्या ५६ वर्षांपासून  वि.हिं.प.देशात आणि जगभरात अनेक ठिकाणी अनेक सेवा प्रकल्प यशस्वी राबवित आहे. आज कोविद वैश्विक महामारीमुळे संपूर्ण  विश्व त्रस्त आहे,तसेच मुंबई महानगरात कोविद रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहेत. दुर्भाग्यवश अनेक मुंबईकरांचा ह्या जीवघेण्या आजारामुळे दुर्देवी मृत्यु  होत आहे.

लॉकडाउनच्या अगदी पहिल्या दिवसा पासून विश्व हिंदू परिषद आपल्या कार्यकर्त्याच्या मदतीने खाद्यान्न वितरण, सैनिटाइज़र, मास्क वितरण, रक्तदान आणि चिकित्सा सहायतेसाठी नागरीकांची युद्ध पातळीवर सेवा करीत आहे.

२३ मार्च रोजी वि.हिं.प. ने आपल्या अधिकृत ट्विटर हैंडल वरून मुंबई मनपाला विनंती केली होती की वि.हिं.प. कार्यकर्ते मुंबई मध्ये फूडपैकेट्स आणि एम्बुलेंस सोबत आपली सेवा प्रदान करण्यास इच्छुक आहेत. देशासमोरील या गंभीर संकटाच्या वेळी मनपाच्या मदतीसाठी आम्ही तयार आहोत परंतु दुर्भाग्यवश मुंबई मनपाने यावर कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. पुन्हा एकदा २८ मे रोजी वि.हिं.प. ने आपल्या अधिकृत ट्विटर हैंडल वरून व  ३ जून रोजी आधिकृत  पत्र लिहून मनपाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्याची विनंती केली व आमचे कार्यकर्ते कोविद महामारीत मुंबई मनपाला सहकार्य  देण्यास तयार असल्याचे सांगितले.  कोविदमुळे मृत्यु  पावलेल्या हिंदू मृतदेहांचे अंत्यविधी करण्यास अनुमती द्यावी , अशी विनंती केली. परंतु मुंबई मनपाने आमची सहकार्य करण्याची कोणतीही विनंती मान्य केली नाही, असे आम्हाला खेदपूर्वक नमूद करावे लागत आहे. त्याचवेळी आम्हाला असेही समजले की मनपाने अशाच कारणासाठी रज़ा अकादमीला ताबडतोब अनुमति दिली. एवढच नाही तर कुप्रसिद्ध संगठना असलेल्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया ( PFI) साठी मुंबईतील सर्व हॉस्पिटल्सना सरकारी आदेश काढून सूचित केले की कोविदमुळे कोणाचा मृत्यू झाल्यास त्याचा अंत्यविधि करण्यासाठी  PFI संगठनेशी संपर्क साधावा. याबाबत असे दिसते की काही निवडक राजकारण्यांच्या दाबावाखाली येत  मुस्लीम तुष्टीकरणाचे गलिच्छ राजकारण केले जात आहे.

मुंबईतील बड़ा कब्रस्तानच्या कार्यकर्त्यांनी सांगितले मुंबई मनापाला हिंदू संघटनाचे सहकार्य प्राप्त न झाल्याने आम्ही २०० हून जास्त हिन्दू मृतदेहांचे अंत्यविधि केले आहेत.वास्तव मात्र असे आहे की हिन्दू संघटनांना अनुमति मागून देखील दिली गेली नाही.विश्व हिन्दू परिषदेने २३ मार्च २०२० पासून म्हणजेच लाॅकडाऊनच्या पहिल्याच  दिवसा पासून मुंबई मनपाला सहकार्य करण्याची तयारी दर्शविली होती.

या पार्श्वभूमीवर वि.हिं.प.अशी  मागणी करीत आहे  की मुस्लिम तुष्टीकरणाचे राजकारण बंद करावे. सेवाकार्यातील दुजाभाव थांबवावा आणि विश्व हिंदू परिषदेला हिन्दू मृतदेहाचे अंत्यविधि करण्याची अनुमती द्यावी,अन्यथा आम्हाला संविधानाद्वारे प्राप्त लोकतांत्रिक अधिकारा अनुसार नाइलाजास्तव आंदोलन करावे लागेल.