मुंबई, दि. २८ (पीसीबी) – मी कोणत्याही पक्षाच्या संपर्कात नाही. कार्यकर्त्यांनी अफवांवर विश्वास ठेऊ नये, असे राष्ट्रवादीचे आमदार व माजी मंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट करून भाजपप्रवेशाच्या चर्चांना पूर्णविराम दिला.
राजेश टोपे हे राष्ट्रवादीचे घनसांवगीचे आमदार आहेत. टोपे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा बऱ्याच दिवसांपासून सुरू आहे. यावर स्पष्टीकरण देत राजेश टोपे यांनी याबाबतच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.
दरम्यान, राष्ट्रवादीचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. तर दुसरीकडे आमदार वैभव पिचड यांनी भाजपात प्रवेश करणार असल्याची घोषणा केली आहे. राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी पदाचा आणि पक्षाचा राजीनामा दिला आहे. चित्रा वाघ या भाजप मध्ये प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे.