मी कुत्र्या-मांजरांवरती बोलत नाही; आंबेडकरांचे आठवलेंच्या टीकेला उत्तर

0
864

मुंबई, दि. २७ (पीसीबी) – भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर  यांनी रिपब्लिकन पक्षाचे प्रमुख आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची तुलना कुत्रा-मांजराशी केली आहे.  आम्ही कुणाच्याही मागे जात नाही, आमची आणि एमआयएम पक्षाची युती लोकसभा निवडणुकीनंतरी कायम राहणार आहे, असे  आंबेडकरांनी म्हटले आहे.

आंबेडकरांना औवेसी चालतात मात्र ते  रिपब्लिकन  पक्षातील नेत्यांशी बोलत नाहीत, अशा शब्दात आठवलेंनी  आंबेडकरांवर टीका केली होती. या टीकेला उत्तर देताना  आंबेडकरांनी आठवले यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. मी कुत्र्या-मांजरांवरती बोलत नसतो, अशा शब्दात आंबेडकर यांनी टीका केली आहे.

आम्ही कुणाच्याही मागे जात नाही, आमची आणि एमआयएम पक्षाची युती लोकसभा निवडणुकीनंतरी कायम राहणार  आहे. आगामी निवडणुकीत आम्ही आरएसएसला एक नंबरचा शत्रू समजत आहे. दरम्यान, रामदास आठवले यांच्या टीकेवर बोलताना मी कुत्र्या-मांजरांवरती बोलत  नाही, असे आंबेडकर म्हणाले.