मिताली राजने जाहीर केली टी-२० क्रिकेटमधून निवृत्ती

0
393

नवी दिल्ली, दि. ३ (पीसीबी) – भारतीय क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राजने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. मिताली राज आता विश्वचषकावर लक्ष केंद्रीत करणार आहे. मिताली राजने ३२ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भारतीय महिला क्रिकेट संघाचे नेतृत्त्व केले. यामध्ये २०१२ (श्रीलंका), २०१४ (बांगलादेश) आणि २०१६ (भारत) या तीन टी-२० विश्वचषकांचा समावेश आहे. मिताली राजच्या नेतृत्त्वात भारतीय संघ विश्वचषक जिंकण्यात मात्र अयशस्वी ठरला.

टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २००० धावा करणारी मिताली राज पहिली भारतीय फलंदाज ठरली होती. मिताली राजने रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या आधी टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २००० धावा पूर्ण केल्या होत्या.

मिताली राजने भारताकडून ८८ टी-२० सामन्यांचे नेतृत्त्व केले आहे. टी-२० करिअरमध्ये ३७.५२ च्या सरासरीने तिने २३६४ धावा केल्या आहेत. यामध्ये १७ अर्धशतकांचा समावेश आहे.