‘मातोश्री’वर शेतकऱ्याच्या ८ वर्षाच्या मुलीला अशी वागणूक मिळणं दुर्दैवी – देवेंद्र फडणवीस

0
679

मुंबई,दि.५(पीसीबी) – एका शेतकऱ्यानं शेती आणि कर्जाबाबत गाऱ्हाणं मांडण्यासाठी थेट मातोश्रीवर धाव घेतली. मात्र मातोश्रीमध्ये शिरण्याचा प्रयत्न करत असताना पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं होतं. याच पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर टीका केली आहे. याबाबत त्यांनी ट्विट केलं आहे.

सातत्याने शेतकऱ्यांवर अन्याय तर होतच आहे. पण अवघ्या ८ वर्षांच्या लहान मुलीला ‘मातोश्री’बाहेर अशी वागणूक मिळत असेल, तर राज्यातील जनतेने अपेक्षा करायची तरी कुणाकडून? मुख्यमंत्र्यांनी या प्रकाराची दखल घ्यावी!, असं ट्विट देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.

दरम्यान, मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी आलेल्या शेतकऱ्याचं आडनाव देशमुख असं आहे. पनवेलवरून वांद्रे येथे ते आले होते. तेव्हा त्यांच्यासोबत त्यांची लहान मुलगीही होती. बराच वेळ ते ‘मातोश्री’ बाहेर बसले होते. त्यानंतर त्यांनी थेट ‘मातोश्री’मध्ये शिरण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्या शेतकऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं.