महाराष्ट्र,दि.३(पीसीबी) – महाविकासआघाडी सरकारची सत्ता आहे म्हणून आज मुंबई व महाराष्ट्र शांत आहे असं वक्तव्य काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केलं आहे. या संदर्भात ट्विट करत त्यांनी भाजपवर टीका केली आहे.
महाविकास आघाडीची सत्ता असल्याने मुंबई व महाराष्ट्र शांत आहे. भाजपाची सत्ता असती तर मुंबईही पेटवली गेली असती. देशात दंगे भडकवणे, सामाजिक सलोखा बिघडवणं हा भाजपाचा डाव आहे. तो डाव मोडून काढला पाहिजे असं ट्विट सचिन सावंत यांनी केलं आहे.
#महाविकासआघाडी सरकारची सत्ता आहे म्हणून आज मुंबई व महाराष्ट्र शांत आहे. @BJP4Maharashtra ची सत्ता असती तर दिल्ली प्रमाणे मुंबई सुध्दा पेटवली गेली असती. देशात दंगे भडकवणे व सामाजिक सलोखा बिघडविण्याचा #भाजपा चा डाव आहे. तो मोडून काढला पाहिजे.
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) March 3, 2020
दरम्यान, याआधी जय श्रीरामच्या घोषणेवरुनही सचिन सावंत यांनी ट्विटच्या माध्यमातून भाजपावर टीका केली आहे.