महाराष्ट्रात माणसाच्या जिवाचं काहीही मूल्य राहिलं नाही – नितेश राणे

0
528

मुंबई, दि.१०(पीसीबी) – महाराष्ट्रात माणसाच्या जिवाचं काहीही मूल्य राहिलं नाही, असं म्हणत आमदार नितेश राणे यांनी ट्विटरवरून राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.

नितेश राणे यांनी मुंबईतील एका रुग्णालयातील एका रुग्णाचा व्हिडीओ शेअर केला आहे. यात रुग्णानं हॉस्पिटलमधील स्थिती सांगितली आहे. हा व्हिडीओ शेअर करत नितेश राणे यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. महाराष्ट्रात माणसांच्या जिवाचं काहीही मूल्य राहिलेलं नाही, असं नितेश राणे यांनी म्हटलं आहे. मुंबईतील परिस्थिती गंभीर असताना आमदार नितेश राणे यांनी एका रुग्णाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आलेला हा रुग्ण नीट लक्ष दिलं जात नसल्याचं व्हिडीओमध्ये सांगत आहे.

दरम्यान शताब्दी हॉस्पिटल. महाराष्ट्रात जिवाचं काहीही मूल्य राहिलेलं नाही. 50 दिवस सरकारचं ऐकून घेतल्यानंतरही प्रत्येक दिवशी हे बघायला मिळत आहे. मग आपल्याला या सरकारची गरज काय?, असं म्हणत नितेश राणे यांनी सरकारवर टीका केली आहे.