महाआघाडीचे सरकार पडावे यासाठी अनेक जण देव पाण्यात ठेवून बसले – धनंजय मुंडे

0
461

महाराष्ट्र, दि. १९ (पीसीबी) – आज भाजपला वाटतंय की काहीतरी होईल आणि आम्ही पुन्हा येऊ. महाआघाडीचे सरकार पडावे यासाठी अनेक जण देव पाण्यात ठेवून बसले आहेत. उम्मीद पे दुनिया कायम है, उम्मीद रखो लेकीन आनेवाले १५ साल तक, कारण महाविकास आघाडीचेच सरकार स्थापन व्हावे ही महाराष्ट्रातील जनतेची इच्छा होती, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे म्हणाले आहेत. ते विधिमंडळात बोलत होते.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावे ऐतिहासिक कर्जमाफीचा गाजावाजा केला. ऑनलाईन फॉर्म माथी मारत माझ्या शेतकऱ्याला तासंतास लाईनीत उभं केलं. जाचक अटी लादल्या. मात्र कर्जमाफी काही झाली नाही. त्याचाच परीणाम म्हणून आज भाजपला विरोधी बाकावर बसावे लागत आहे, असेही ते म्हणाले आहेत.