धुळे, दि. ६ (पीसीबी) – राज्याचे रोहयो आणि पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांच्यापासून माझ्या जीविताला धोका आहे, असा गंभीर आरोप राज्याचे माजी मंत्री हेमंत देशमुख यांनी केला आहे. माझ्या जीवाला काही झाल्यास, जयकुमार रावल आणि गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांना आरोपी करावे, अशा आशयाचे पत्र माजी कामगार मंत्री हेमंत देशमुख यांनी राज्यपालांना पाठवले आहे, याबाबतची माहिती देशमुख यांनी आज (सोमवार) पत्रकार परिषदेत दिली.
Home Notifications मंत्री जयकुमार रावल यांच्यापासून माझ्या जीविताला धोका; माजी मंत्र्यांचे राज्यपालांना पत्र