भीमा कोरेगावमध्ये झालेल्या दंगलीला फडणवीसांचीच फूस होती – वामन मेश्राम

0
373

पुणे,दि.१(पीसीबी) – तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पुण्यातील भीमा कोरेगाव येथे झालेल्या हिंसाचाराची कल्पना होती. बामसेफ आणि भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांनी “या दंगलीला फडणवीसांचीच फूस होती” असा आरोप केला. मंगळवारी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

मेश्राम यांनी कोरेगाव भीमा येथे उसळलेल्या दंगलीची चौकशी करण्यासाठी नेमण्यात आलेल्या चौकशी आयोगासमोर देवेंद्र फडणवीस यांना बोलावून त्यांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी केली.उफाळलेल्या दंगलीला तत्कालिन राज्य शासन जबाबदार आहे, असा आरोप मेश्राम यांनी केली आहे. तसंच या दंगलीमागे मिलिंद एकबोटे आणि मनोहर भिडे यांचा हात आहे. याबाबतचे पुरावे भारत मुक्ती मोर्चाकडे आहेत, असंही वामन मेश्राम यांनी सांगितलं आहे.

हे पुरावे उच्च न्यायालय आणि चौकशी आयोगासमोर सादर करण्यात आले आहेत. यानंतरही तत्कालिन मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत बोलताना मिलिंद एकबोटे आणि मनोहर भिडे यांना क्लिनचिट दिल्याचं म्हटलं होतं, असं मेश्राम यांनी सांगितलं आहे.