“भारतीय जनता पार्टीचा जो उन्माद आणि माज होता तो…”

0
243

सिंधुदुर्ग,दि.०५(पीसीबी) – “भारतीय जनता पार्टीचा जो उन्माद आणि माज होता तो विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत लोकांनी उतरवला. हे फक्त सरकारचं लक्ष विचलीत करण्याचं काम करत आहेत. आम्ही तीनही पक्ष एकत्रित लढलो तर भाजपचं डिपॉजिट सुद्धा राहणार नाही”, असा घणाघात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केला. ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते.

“महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून भाजपने केलेला थयथयाट आणि नाटक बघून सुशिक्षित मतदारांनी मतपेटीतून भाजपचा माज उतरवला”, असा टोला मुश्रीफ यांनी लगावला.

दरम्यान “भाजपने गेल्या वर्षभरात अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरण, अभिनेत्री कंगना रनौत प्रकरण असेल किंवा ईडी-सीबीआयचा गैरवापर करून आपल्या विचारांचे जे लोक नाहीत त्यांना अडचणीत आणण्याचं काम केलं”, असा आरोप त्यांनी केला.