भारताने बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये मिळवले सहविजेतेपद

0
223

नवी दिल्ली, दि.३१(पीसीबी) : बुद्धिबळ विश्वात प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या ऑलिम्पियाड स्पर्धेत भारताने रविवारी रशियाच्या बरोबरीने ऐतिहासिक सहविजेतेपद पटकावले. जलद प्रकारातील विद्यमान जगज्जेती कोनेरु हम्पी आणि माजी जगज्जेता विश्वनाथन आनंद अशा मोठ्या खेळाडूंच्या अनुभवासह, दिव्या देशमुख, प्रज्ञानंद, निहाल सरीन अशा युवा बुद्धिबळपटूंच्या असीम ऊर्जेला विदिथ गुजरातीच्या नेतृत्वाची साथ मिळाली.

अंतिम झालेल्या लढतीत भारताचा मुकाबला हा रशियाशी होता. पहिला सामना 3-3 असा बरोबरीत झाला मात्र दुसऱ्या सामन्याला निर्णायक महत्त्व प्राप्त झाल होत. या सामन्यात कोनेरु हम्पीचा दारुण पराभव झाला. परंतु दिव्या देशमुख जेतेपदाच्या मार्गावर होती. मात्र दिव्या देशमुख तसेच निहाल सरीनची इंटरनेट जोडणी अचानक खंडित झाली आणि वेळेवर चाली पूर्ण करता न आल्याने त्यांचा पराभव झाल्याचे जाहीर झाले. परत दुसऱ्यांदा झालेल्या सामन्यामध्ये भारत 1.5-4.5 पराभूत झाला होता. पण भारतीय संघाने आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ संघटनेकडे याविषयी अपील केले. ते ग्राह्य़ धरले गेले आणि फिडेचे अध्यक्ष अर्कादी द्वोर्कोविच यांनी भारत व रशियाला सहविजेते घोषित केले.