भारतातील मुसलमान रामाचे वंशज – गिरीराज सिंह

0
637

नवी दिल्ली, दि.२२ (पीसीबी) – भारतातील मुसलमान हे मुघलांचे वंशज नसून रामाचे वंशज आहेत. त्यामुळे त्यांनी राम मंदिराला विरोध करू नये. उलट त्यांनी मंदिराला पाठिंबा द्यावा, नाहीतर त्यांच्यावर हिंदू नाराज होतील. राम मंदिर होणे आवश्यक आहे, हे प्रकरण कर्करोगाच्या दुसऱ्या टप्प्यात आहे. मंदिर उभारले नाही, तर यावर उपचार करणे, अशक्य होऊन बसेल, असे केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी म्हटले आहे.

लोकसंख्या समाधान फाउंडेशनच्या वतीने लोकसंख्या कायदा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

ज्या ठिकाणी हिंदूंची संख्या कमी आहे, त्या ठिकाणी हिंदूचा आवाज दाबला जातो. सर्वधर्म समभाव शिकवायचे असेल तर मुसलमानांना शिकवा. सनातन वगळता सर्वधर्म समभाव शक्य नसल्याचे ते म्हणाले. देशात ज्या ठिकाणी हिंदूची संख्या कमी झाली आहे, त्या ठिकाणी सामाजिक समरसता नष्ट झाली आहे.  देशाचे जितके नुकसान मुघलांनी केले आहे. तितेकच नुकसान नेत्यांनी केल्याचे ते म्हणाले. मी सनातन धर्मासाठी भाजप, मंत्रिपद आणि खासदारकीला सोडचिठ्ठी देऊ शकतो, असेही ते म्हणाले. देशाचा विकास आणि सामाजिक समरसतेसाठी लोकसंख्या कायदा करणे गरजेचा आहे. वाढती लोकसंख्या मोठी समस्या असून दर मिनिटाला २९ बालके जन्माला येतात, असे ते म्हणाले.