भिवंडी, दि. १० (पीसीबी) – भाजप-शिवसेनेत युती झाली असली तरी भिवंडी लोकसभा मतदारसंघात युतीत बिघाडी झाल्याचे समोर आले आहे. शिवसेनेचे ठाणे जिल्हा ग्रामीण संपर्कप्रमुख सुरेश बाळ्या मामा म्हात्रे यांना अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करून भाजपचे उमेदवार कपिल पाटील यांना आव्हान दिले आहे. तसेच निवडणूक लढवण्याबाबतचा निर्णय मतदारसंघातील नागरिकांशी बोलून जाहीर करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. भाजप खासदार व उमेदवार कपिल पाटील यांना सुरेश म्हात्रे यांनी सुरूवातीपासूनच विरोध ठेवला होता. त्यांनी काँग्रेसकडून उमेदवारी मिळवण्यासाठी देखील प्रयत्न केले होते. परंतु, काँग्रेसची उमेदवारी मिळत नसल्याने त्यांनी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
Home Notifications भाजप-शिवसेना युतीत बिघाडी; भिवंडी मतदारसंघात शिवसेनेच्या जिल्हा संपर्कप्रमुखाचा अपक्ष अर्ज दाखल