नवी दिल्ली, दि. १० (पीसीबी) – लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यासाठी येत्या रविवारी मतदान होत आहे. या टप्प्यात मतदान होणाऱ्या ५९ पैकी ४४ जागा भाजपकडे असून त्या कायम राखण्याचे आव्हान त्या पक्षापुढे आहे. उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये विरोधकांच्या महाआघाडीचा भाजपला सामना करावा लागत आहे. पश्चिम बंगालमध्ये भाजपने आव्हान उभे केल्याच्या पाश्र्वभूमीवर तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची कसोटी आहे.