भांडणे विसरुन सुरक्षिततेविषयी कठोर निर्णय घेणे आवश्यक – अमृता फडणवीस

0
357

मुंबई, दि.६ (पीसीबी) – वर्धा येथील हिंगणघाट आणि औरंगाबादमधील घटनेवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी संताप व्यक्त केला आहे. या घटना दुर्दैवी असल्याचे त्यांनी म्हटले आहे. यावेळी त्यांनी महिलांच्या सुरक्षेसाठी कठोर निर्णय घेणे गरजेचं असल्याचे मत व्यक्त केले आहे. आपल्यातील भांडणे विसरुन सुरक्षिततेविषयी कठोर निर्णय घेणे आवश्यक”. या ट्विटमध्ये अमृता फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना टॅग केले आहे.