मुंबई, दि.६ (पीसीबी) – वर्धा येथील हिंगणघाट आणि औरंगाबादमधील घटनेवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी संताप व्यक्त केला आहे. या घटना दुर्दैवी असल्याचे त्यांनी म्हटले आहे. यावेळी त्यांनी महिलांच्या सुरक्षेसाठी कठोर निर्णय घेणे गरजेचं असल्याचे मत व्यक्त केले आहे. आपल्यातील भांडणे विसरुन सुरक्षिततेविषयी कठोर निर्णय घेणे आवश्यक”. या ट्विटमध्ये अमृता फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना टॅग केले आहे.
महाराष्ट्रात गेल्या २ महिन्यात ४ acid attack च्य दुर्देवी घटना घडलेल्या अहेत!नागपुर मधे हिंगणघाट येथे पेट्रोल टाकून प्रोफेसर अंकिता ला जाळण्याचा प्रयत्न,औरंगाबाद मधील बलात्काराचे प्रकरण-ऐकून त्रास होतो!आपल्यातील भांडणे विसरुन-सुरक्षितते विषयी कठोर निर्णय घेणे आवश्यक @OfficeofUT
— AMRUTA FADNAVIS (@fadnavis_amruta) February 6, 2020