पूजा चव्हाण प्रकरण: अजित पवारांनी केली संजय राठोड यांची पाठराखण म्हणाले…’

0
351

मुंबई, दि.१८ (पीसीबी) : सध्या सगळीकडे पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरुन राजकारणात वेगळेच पडसाद उमटतांना दिसत आहेत. त्यामुळे भाजपा कडून वनमंत्री संजय राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहे तर शिवसेना यावर अद्यापही कोणतीही भूमिका घेताना दिसत आहे. मात्र संजय राठोड यांनी अजूनही या विषयावर मौन सोडलं नसून त्यांचं नाव समोर आल्यापासून यावर कोणतीही प्रतिक्रिया त्यांनी दिलेली नाही. दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे मात्र त्यांच्या या प्रतिक्रियेवरून ते हे प्रकरण पाठीशी घालत आहेत असच चित्र दिसतंय.

अजित पवार म्हणाले कि, “आताच्या घडीला ती व्यक्ती निराधार आहे ही वस्तुस्थिती तर खऱी आहे. मागेदेखील धनंजय मुंडेंच्या बाबतीत अशाच पद्दतीचे आरोप झाले. माहिती न घेता राजीनामा घेतला असता तर त्यांची बदनामी झाली असती. चौकशी होऊन संपूर्ण चित्र स्पष्ट होत नाही तोपर्यंत एखाद्याला दोषी धरायचं किंवा त्या पदावरुन हटवायचं हे कितपत योग्य आहे याचा विचार झाला पाहिजे,”

पुढे पवार हेही म्हणाले कि, “संजय राठोड गुरुवारी खुलासा करणार आहेत अशी माहिती मला मिळाली होती. माझा आणि त्यांचा काही संपर्क झाला नाही, पण त्यांच्यावर जे आरोप झाले त्याबाबत रितसर चौकशी झाली पाहिजे असं आम्ही सांगितलं आहे. पण जोपर्यंत चित्र स्पष्ट होत नाही तोपर्यंत निष्पाप व्यक्तीचं नाव घेऊन त्यांना संशयाच्या भोवऱ्यात टाकणं फार उचित नाही,”