पुढची ५ -१० वर्ष अशीच आमच्या अर्थसंकल्पावर पुस्तकं लिहित राहा – उद्धव ठाकरे

0
303

मुंबई,दि.५(पीसीबी) – पुढची ५-१० वर्ष अशीच आमच्या अर्थसंकल्पावर पुस्तकं लिहित राहा, असं वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी लिहिलेल्या ‘अर्थसंकल्प सोप्या भाषेत’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा मुंबईमध्ये पडला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणातून फडणवीसांना टोला लगावला आहे.

एक चांगलं झालं तुम्ही आमच्या पहिल्या अर्थसंकल्पाच्या आधीच तुम्ही हे पुस्तक लिहिलं आहे. पुढील पाच-दहा वर्ष असंच आमच्या अर्थसंकल्पावर पुस्तक लिहित राहा. आम्हालाही नेमक्या उणीवा काय राहिल्या आहेत हे कळेल, असं म्हणत उद्धव ठाकरे फडणवीस यांनी टोला लगावला.

दरम्यान, आपलं मनोगत व्यक्त करताना त्यांनी जो विषय आपल्याला कळत नाही त्यावर तारे तोडू नयेत, असं म्हणत ठाकरेंनी जास्त बोलणं टाळलं. मराठीत कदाचित पहिल्यांदा पुस्तक लिहिलं गेलं असेल असं सांगताना हे पुस्तक सर्वात आधी मीच वाचणार आहे, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.