पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या योजनांना विरोध केल्यास हे सरकार उलथवून टाकू – देवेंद्र फडणवीस

0
326

धुळे,दि.४(पीसीबी) – माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी “पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या योजनांच्या पैशांना आणि प्रकल्पांना या सरकारने विरोध केल्यास हे सरकार उलथवून टाकू” असा इशारा दिला आहे. धुळे आणि नंदुरबार जिल्हा परिषदांच्या निवडणुकीसाठी फडणवीस यांच्या सभा शुक्रवारी जिल्ह्यात झाल्या. यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र सोडले.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विषयी काँग्रेसच्या पुस्तिकेत आक्षेपार्ह मजकूर छापण्यात आला होता. यावरूनही फडणवीसांनी शिवसेनेवर निशाणा साधला. सत्तेसाठी लाचारी स्वीकारलेली शिवसेना मूग गिळून गप्प आहे. सत्तेसाठी शिवसेनेच्या वाघाची मांजर झाली असून ती आता डरकाळीऐवजी दिल्लीच्या ‘मातोश्री’साठी म्यॉव म्यॉव करीत असल्याची कडवट टीका त्यांनी केली आहे.

महाराष्ट्राच्या जनतेशी शिवसेनेनं बईमानी केली. मतं आमच्यासोबत मिळून मागितली पण संसार दुसऱ्याशी थाटला. मुखमंत्रिपदाच्या हव्यासापोटी उद्धव ठकरेंनी विश्वासघात केला, अशी टीकाही त्यांनी केली आहे.