“निसर्ग परीक्षा घेतोय पण आपण ताकदीने सामना करु”

0
282

मुंबई, दि.३(पीसीबी) – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चक्रीवादळाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर व्हिडीओच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला आहे. यावेळी निसर्ग परीक्षा घेतोय पण आपण ताकदीने सामना करु, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

चक्रीवादळ आपल्यापर्यंत पोहोचण्यापूर्वी ओसरावं किंवा हवेतच नाहीसं व्हावं, अशी माझी प्रार्थना आहे. या प्रार्थनेला यश मिळेल, पण जे काही दिसत आहे ती शक्यता पाहिल्यानंतर हे वादळ आज दुपारपर्यंत आपल्या किनाऱ्यावर धडकणार आहे, उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे.

दरम्यान किनारपट्टी आणि जवळील भागात चक्रीवादळाचा परिणाम होईल. आपण सज्ज आहोतच. तीनही दलांना सज्ज राहण्याचा इशारा दिला आहे. त्याप्रमाणे एनडीआरएफच्या 15 तर एसडीआरएफच्या 4 तुकड्या अशा एकूण 19 तुकड्या विविध भागांमध्ये तैनात करण्यात आल्या आहेत, अशी माहिती उद्धव ठाकरेंनी दिली आहे.