नागरिकत्व सुधारणा कायदा माझ्या जातीविरुद्ध – जितेंद्र आव्हाड

0
645

नागपूर,दि.१८(पीसीबी) – नागरिकत्व सुधारणा कायदा हा माझ्या जातीविरुद्ध आहे. माझी जात वंजारी आहे, असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी विधीमंडळात केलं आहे. नागरिकत्व कायद्यावरुन आव्हाडांनी सभागृहात विरोध दर्शवला आहे.

माझी जात वंजारी आहे. माझ्या समाजातील ५० टक्के जनता शेतमजुरी करायला जाते. अशा बाहेर गेलेल्या अनेक शेतमजुरांची बाळंतपणेसुद्धा शेतात होत असतात. त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारची कागदपत्रे नसतात, असं आव्हाड म्हणाले आहेत.

राज्यातील मोठा वर्ग भटक्या पद्धतीने जीवन जगतो. त्यांची ग्रामपंचायत किंवा नगरपरिषद हद्दीत अजूनही नोंद झालेली नाही. जवळपास ९० ते ९५ टक्के भटक्या लोकांकडे रहिवाशी प्रमाणपत्र नाही, असं रेणके आयोग सांगतो, अशी माहितीही आव्हाडांनी दिली आहे.