नगरच्या निवडणुकीतील प्रकरणाची लाज वाटते; जितेंद्र आव्हाडांची ट्विटद्वारे भावना व्यक्त

0
1110

मुंबई, दि. २९ (पीसीबी) – अहमदनगरमध्ये नवी राजकीय खेळी रंगली असून जास्त जागा असूनही शिवसेना सत्ता स्थापन करू शकली नाही. राष्ट्रवादीच्या टेकूने भाजपचा महापौर खुर्चीत बसला. एकीकडे भाजपाविरोधात समविचारी पक्षांनी एकत्र येण्याचे आवाहन शरद पवारांनी केले आहे. दुसरीकडे मात्र सातत्याने भाजपवर टीकेची झोड उठवून त्याच पक्षाच्या सोबत  गेल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगील आहे. या सर्व प्रकरणाची लाज वाटत असल्याचे राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाडांनी ट्विट करत सांगितले. राष्ट्रवादीच्या या नगरसेवकांना पक्षाकडून कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असली तरी राष्ट्रवादीचे बडे नेते या प्रकरणी चुप्पी साधली आहे.

असे असताना आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मात्र आपली भूमिका सडेतोडपणे मांडली असून नगरच्या निवडणुकीतील प्रकारची लाज वाटते असे ट्विट केले आहे. विशेष म्हणजे यामध्ये त्यांनी  उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी देखील मेन्शन केले आहे. पत्रकार विजय चोरमारे यांच्या ट्विटला उत्तर देताना आव्हाड यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.