मुंबई, दि. ४ (पीसीबी) – पश्चिम महाराष्ट्रातील काही भागातील दुष्काळाच्या गंभीर परिस्थितीकडे राज्य सरकारचे लक्ष वेधून त्या भागात तातडीच्या उपाययोजना करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीची वेळ मागितली आहे. मुख्यमंत्री आणि शरद पवार यांच्यातील ही भेट नजीकच्या काही दिवसांत होण्याची शक्यता आहे.