दक्षिण कराडमधूनच विधानसभा लढवणार; पृथ्वीराज चव्हाणांची स्पष्टोक्ती

0
781

लातूर, दि. २६ (पीसीबी) – दक्षिण कराडमधूनच विधानसभा लढवणार असल्याचे स्पष्ट करून काँग्रेस नेते व  माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पुणे, सांगली  येथून लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम दिला.

लातूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत चव्हाण बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, राज्यात, केंद्रात  आघाडी, महाआघाडी होण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. पंतप्रधान कोण होणार हा महत्त्वाचे प्रश्न नाही, तर मोदी सरकारचा पराभव करणे, हा एकमेव आमच्यासमोर हेतू आहे. विरोधी पक्षांच्या जास्त जागा निवडून आल्यानंतर सर्वजण एकत्र बसून पंतप्रधानपदाचा निर्णय घेण्यात येईल, असे ते म्हणाले.

मोदी सरकार विकासाचा अजेंडा जनतेसमोर ठेवण्यापेक्षा भूलथापा मारत आहे. विरोधांची आघाडी होऊ नये, असा त्यांचा प्रयत्न सुरू आहे. विरोधकामध्ये फूट कशी पडेल, हेच काम ते करत आहेत.   विकासाच्या जोरावर ते सत्तेत येऊ शकत नाही, त्यामुळे ते पुन्हा राम मंदिराचा मुद्दा पुढे करतीत, किंवा हल्ले घडवून आणतील, असा आरोप चव्हाण यांनी यावेळी केला.