तेजस्विनी कदम युवा मंचाच्या वतीने बौध्दनगर येथील पुरग्रस्तांना अन्नधान्य, चादर वाटप

0
484

पिंपरी, दि. ७ (पीसीबी) – गेल्या आठ दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे पवना आणि मुळा नदीला महापूर आला. पुराचे पाणी पिंपरीतील बौद्धनगर परिसरातील नागरिकांच्या घरात घुसले. येथील पुरग्रस्त नागरिकांना तेजस्विनी कदम युवा मंचाच्या वतीने अन्नधान्य आणि चादर वाटप करण्यात आला आहे.

यावेळी भाजप शहर युवती आघाडीच्या अध्यक्षा तेजस्विनी कदम यांनी पूरग्रस्त नागरिकांची भेट घेऊन त्यांच्याशी विचारपूस केली. त्यांच्या समस्या समजून घेतल्या. तसेच पुरग्रस्तांना अन्नधान्य, ब्लँकेट   वाटप करून सर्वतोपरी मदत करण्यात येईल, असे सांगितले.

यावेळी शहर युवती आघाडी व सोशल मीडिया सदस्य आदी उपस्थित होते.